IDBI Bank : केंद्रात सत्तेत असलेले मोदी सरकार कायम काही ना काही विकण्याच्या तयारीत असते, अशी टीका कायमच विरोधीपक्षातील लोक करत असतात. आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आणि एलआयसीची हिस्सेदारी असलेली आयडीबीआय बँक आता सरकार विकण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बँकेच्या विक्रीसंदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत. आता या विक्रीच्या प्रक्रियेला जोर आला आहे, असे दिसत आहे. कारण सरकारने खरेदीदारांसंबंधी चौकशी सुरु केली आहे.
Related Articles
या बँकेत केंद्र सरकारचा 45.48% हिस्सा आहे तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचा 49.24% हिस्सा आहे. सरकार आणि एलआयसी मिळून बँकेतील 60.7% शेअर विकणार आहे. यासाठी अनेक बँका बोली लावण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या नव्या वर्षात संपूर्ण अधिकृत प्रक्रिया पूर्ण होईल, असेही सांगितले जात आहे.
कोटक महिंद्रा बँक, सीएसबी बँक, एमिरेट्स एनबीडी अशा अनेक संस्थांनी या बँकेच्या खरेदीची तयारी दाखवली आहे. मार्चपर्यंत या बँकेची अधिकृत विक्री होऊ शकते, असा अंदाज आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुम्ही या प्रक्रीयेकडे लक्ष ठेवायला हवे. बँकेची हिस्सेदारी विकण्याचे कारण काय? याबाबत मात्र सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच एलआयसीने सुद्धा याबाबत काहीही स्टेटमेंट दिलेले नाही.
अच्छे दिन म्हणतात ते हेच का? असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारला आहे. दरवेळी अच्छे दिन म्हणायचे आणि काहीतरी विकायचे ही सरकारची स्टाईल असल्याचे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.