माझे आजोबा, आधी ते मुंबईत होते नाव विसरले पण मोठ्या कंपनीत वरच्या पदावर. मुंबईत घरही होतं मोठं. पण मग बॉसशी तत्वावरून वाजलं तशी सगलं सोडून तडक नवसारीला आले. आजी सांगायची, सहा मुलं, त्यांच्या खाऊचा एक पितळी डबा अन पाण्याची सुरई इतकच घेऊ दिलं आजोबांनी अन नुसती दाराला कडी लावून मुंबई सोडली. परत फिरून बघितलंही नाही. आजीला फार वाईट वाटे, 12-15 एक वर्षाचा सगळा संसार, भांडीकुंडी, कपडेलत्ते सगळं टाकून