आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक ताणतणाव घेऊन आपण वावरत असतो. अनेकदा मन, शरीर यांना म्हणावा तसा आराम मिळत नाही. कळतं पण वळत नाही अशी काहीशी परिस्थिती होते. मग कधीतरी नैराश्य येतं. बीपी हलू लागतं. काही आजार, आयुष्यातले काही धक्के अजूनच परिस्थिती वाईट बनवतात. नेहमीच आपल्याला योग्य मदत मिळते, घेता येते असं नाही. कधी कधी अगदी तातपुरती मदत गरजेची असते. जेव्हा प्रोफेशनल मदत गरजेची असेल तेव्हा मात्र न