Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मोदींच्या कॅबिनेट बैठकीत विकसित भारत, व्हिजन 2047 सह पुढील 5 वर्षांच्या योजनांवर चर्चा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. ज्यामध्ये त्यांनी विकसित भारत: 2047 च्या व्हिजनवर चर्चा केली. तसेच पुढील पाच वर्षांच्या कामावर विचारमंथन केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही शेवटची सभा आहे. Modi’s cabinet meeting discusses plans for next 5 years including Developed India, Vision 2047

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदिवसीय बैठकीदरम्यान, मे महिन्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ उचलल्या जाणाऱ्या 100 दिवसांच्या कार्यसूचीवर चर्चा करण्यात आली.

ते म्हणाले की, विकसित भारताचा रोडमॅप हा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे आणि सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शैक्षणिक संस्था, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक समुदाय आणि इतरांशी सल्लामसलत करून तयार करण्यात आला आहे.

सरकारच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी पीएम मोदी वेळोवेळी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठका घेत आहेत, मात्र एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेली बैठक अत्यंत महत्त्वाची आहे.


  • PM Modi : 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प आणि ग्रामीण भागात घरांसाठी सवलतीच्या दरात कर्ज!!

निवडणूक आयोग येत्या 15 दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.

17-18 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे भाजपचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. पंतप्रधान कार्यकर्त्यांना म्हणाले- पक्षाला प्रत्येक बूथवर 370 मते वाढवावी लागतील. 100 दिवसांची जनसंपर्क मोहीम राबवावी लागेल. भाजपने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामांचाही प्रचार करावा लागणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी नेत्यांना दोन दिवस मौन पाळण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी पक्षश्रेष्ठींना मौन पाळण्यास म्हणजेच मीडियासमोर जाऊन बैठकीबाबत काहीही बोलू नये, असे सांगितले आहे.

यासोबतच मोदींनी विभागीय प्रभारींना प्रत्येक पन्ना प्रमुखांना 30 दिवसांतून एकदा भेटण्यास सांगितले आहे. भाजपने प्रत्येक मतदारापर्यंत वैयक्तिकरित्या पोहोचावे, अशी मोदींची इच्छा आहे. यासाठी सर्व नेते व कार्यकर्त्यांना प्रत्येक बुथवर 370 मते वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

देशात 10 लाख 35 हजार बूथ आहेत, म्हणजे एका लोकसभा मतदारसंघात सुमारे 1900 बूथ आहेत. प्रत्येक बूथवर 370 मतांची भर पडल्यास एका लोकसभा मतदारसंघात 7 लाख मते जोडावी लागतील आणि संपूर्ण देशात 38 कोटी मतदार जोडावे लागतील. सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पंतप्रधानांचे संपूर्ण उद्दिष्ट विजयाचा विक्रम रचण्याचे आहे.

Modi’s cabinet meeting discusses plans for next 5 years including Developed India, Vision 2047



This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

मोदींच्या कॅबिनेट बैठकीत विकसित भारत, व्हिजन 2047 सह पुढील 5 वर्षांच्या योजनांवर चर्चा

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×