विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.Announcement of construction of 10 lakh houses in Modi Awas Yojana for backward classes!!
Related Articles
पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वितरण करून देशातील शेतकऱ्यांना खात्यात २१ हजार कोटींचे लाभ दिले, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करून राज्यातील शेतकऱ्यांना अजून ३ हजार ८०० कोटींचे लाभ दिले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातील स्वयं सहाय्यता गटांना ८०० कोटींच्या निधीचे वाटप, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील १ करोड नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, मोदी आवास योजनेचा शुभारंभ याप्रसंगी करण्यात आला. या अंतर्गत मागासवर्गीय नागरिकांसाठी १० लाख घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली.
- विदर्भातले 10 मतदारसंघ, 4900 कोटींचे प्रकल्प; 88 लाख शेतकऱ्यांना निधीचा फायदा; मोदींच्या आजच्या दौऱ्याचे फलित!!
त्यासोबतच विदर्भातील न्यू आष्टी – अमळनेर नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन व प्रवासी सेवेचा शुभारंभ, वर्धा- कळंब नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन आणि प्रवासी सेवेचा शुभारंभ, वरोरा- वणी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे लोकार्पण, साकोली-भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, सलाईखुर्द-तिरोडा महामार्गावरील कॉक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण तसेच यवतमाळ शहरातील पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले.
यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदीजी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यासोबतच त्यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या दशकभरात सुवर्णकाळ सुरू झाला असून अनेक क्षेत्रात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियानाद्वारे ५५ हजार महिलांना लाभ होणार असून ही संख्या २ कोटीपर्यंत वाढवण्यात येईल. मोदी आणि जनता हा फेवीकॉलचा मजबूत जोड असून केंद्र सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा विजयी होतील, तसेच त्यांनी दिलेला एनडीए ४०० पार आणि महाराष्ट्र ४५ पार हा नारा खरा करून दाखवण्यासाठी सर्वस्व पणाला लावू आणि मोदीजींचे हात बळकट करू असे यावेळी जाहीर केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, जलसंधारण तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावनाताई गवळी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार हंसराज अहिर, आमदार मदन येरावार, अशोक उईके, संजीव रेड्डी बोदकुरवार, निलय नाईक, नामदेवराव ससाणे उपस्थित होते.
Announcement of construction of 10 lakh houses in Modi Awas Yojana for backward classes!!
महत्वाच्या बातम्या
- शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- वाजवा तुतारी, गाडा गद्दारी; मात्र बारामतीत व्हायरल केले पत्र “निनावी”!!
- सीबीआयने अखिलेश यादव यांना पाठवले समन्स
- केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!