बिझी शेड्यूल आणि धावपळीमुळे अनेक लोक सकाळी नाष्टा करु शकत नाही. अनेक लोक वजन कमी व्हावे यासाठी नाष्टा करणे सोडतात. त्यांना वाटते की, यामुळे कॅलरी इनटेक कमी होईल. परंतु या चुकीमुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी सकाळी नाष्ट न केल्यामुळे बॉडीवर होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.
सकाळचा नाष्टा का सोडू नये
सकाळचा नाष्टा आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यात मदत करतो. यासोबतच सकाळच्या नाष्ट्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश केल्याने आपली बॉडी नेहमी हेल्दी राहते. सकाळचा नाष्टा न केल्याने वजन वाढणे, हार्ट डिसिज, डायबिटीज आणि स्ट्रेस सारख्या समस्या वाढतात. यामुळे सकाळी उठण्याच्या 1 तासाच्या आतच नष्टा करुन घ्यावा.