Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

निजामशाहीच्या अस्ताचा साक्षीदार असलेला 'जीवधन किल्ला'


आपल्या महाराष्ट्र देशामध्ये जवळपास ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत यातील बऱ्याच किल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तर काही किल्ले आजही आपला मूक इतिहास स्वत:जवळ बाळगून बसलेले आहेत. असेच काही प्रसिद्ध किल्ले 'जुन्नरच्या उर्फ जीर्णनगरच्या' आसमंतातत विविध कालखंडात बांधले गेले आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक महत्वाचा किल्ला म्हणजे नाणेघाटाचा अगदी सख्खा शेजारी असणारा आणि आपल्या बेलाग सूळक्याने सगळ्या भटक्यांना खुणावणारा 'जीवधन किल्ला' आजही आपले अस्तित्व आणि आपला इतिहास जपत नाणेघाटाच्या शेजारी उभा आहे. 

सातवाहनकालीन नाणेघाट आणि जीवधन किल्ला हे पाहायचे असल्यास आपल्याला प्राचीन नगरी जुन्नर येथे येऊन आसमंतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या 'शिवनेरी किल्ल्याचे' खालूनच दर्शन घेऊन 'शिवाजी चौकातून' आपटाळे  मार्गे आपल्याला 'जीवधन' किल्ल्याच्या पायथ्याचे 'घाटघर' हे गाव गाठावे लागते. यासाठी आपली स्वत:ची गाडी असेल तर कधीही उत्तम ठरते आपला वेळ देखील वाचतो परंतु ज्यांना बस ने जायचे असेल त्यांनी जुन्नर बस स्थानकावरून 'घाटघर' गावाची बस पकडणे गरजेचे आहे. 'जुन्नर' ते 'घाटघर' हे अंतर जवळपास ३७ कि.मी आहे. आता नाणेघाटापर्यंत डांबरी रस्ता झाला असल्यामुळे स्वत:ची गाडी असल्यास थेट नाणेघाटापर्यंत जाते. अन्यथा बस आपल्याला आजही घाटघर गावाच्या अलीकडे सोडते. बसने आपल्याला जुन्नर पासून जवळपास दीड तासांचा अवधी लागतो. तेथून पुढे ३ किलोमीटर डांबरी रस्त्यावरून चालत आपल्याला नाणेघाटापर्यंत जाता येते. 

नाणेघाट येथून 'जीवधन' किल्ल्याचे रूप हे फार सुंदर दिसते.

नाणेघाट येथून 'जीवधन' किल्ल्याचे रूप हे फार सुंदर दिसते. नाणेघाट परिसरात आता हॉटेल्स झाल्यामुळे फारसा रस्ता चुकत देखील नाही. नाणेघाटाच्या डाव्या बाजूला पठारावरून जीवधन किल्ल्याच्या जवळ व्यवस्थित जायला रस्ता आहे. आता आजूबाजूला हॉटेल्स खूप झाल्यामुळे येथे जेवणाची सोय देखील व्यवस्थित झालेली दिसून येते. पूर्वी येथे हॉटेल्स नसल्यामुळे येथे फक्त 'सुभाष आढारी' यांचे घर होते. जीवधन किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एक 'जुन्नर दरवाजा' आणि दुसरा 'कल्याण दरवाजा'. त्यातील 'जुन्नर दरवाजाचा' मार्ग हा घाटघर गावातून येतो. नाणेघाटावरून 'सुभाष आढारी' यांच्या घराच्या मागून 'जीवधन'  किल्ल्यावर 'कल्याण दरवाजाकडे' जाणारी उजवीकडची वाट पकडावी. 'जीवधन किल्ला' परिसर आता वनखात्याकडे असल्यामुळे जीवधन किल्ल्याच्या पाऊलवाटेवर त्यांनी बाणांंच्या खुणा देखील केलेल्या आपल्याला दिसून येतात. 

'कल्याण दरवाज्याने' वर चढून जाण्यासाठी वनखात्याने आता काही ठिकाणी नैसर्गिक पायऱ्यांंना तारांची वेष्टने लावून मार्ग अधिक सोपा केल्यामुळे रस्ता आजीबात चुकत नाही. पहिल्या तीन पायऱ्या चढून रस्ता डावीकडे वळतो तीच वाट पुढे आपल्याला एका दगडांच्यापाशी घेऊन जाते तेथून आपल्याला सरळ वर चढायचे असते. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. 'जीवधन किल्ल्याच्या' बेचक्यामध्ये घनदाट जंगल असल्यामुळे आपल्याला तेथे 'शेखरू खार' देखील दिसते तसेच 'ब्ल्यू मॉरमॉन' हे फुलपाखरू देखील पाहायला मिळते. याच पाऊलवाटेने थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला जीवधन किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या कोरीव पायऱ्या लागतात. आणि उजवीकडे पाहिले असता दर्शन होते ते बेलाग आणि उंच 'वानरलिंगी सूळक्याचे' 'जीवधन' येथील या कातळात खोदलेल्या पायऱ्या यांची रचना आपण निट पाहिली असता आपल्याला हडसर, केंजळगड येथे असलेल्या पायऱ्यांंशी त्याचे साम्य आपल्याला दिसून येते. 

जीवधन किल्ल्यावर जाताना दिसणारे नाणेघाटाचे विहंगम दृश्य.

या पायऱ्यांच्या डाव्या बाजूने आपण परत वर चढायला लागावे साधारणपणे १५ मिनिटात या पायऱ्या चढून आपण 'जीवधन' किल्ल्याच्या दरवाजाच्या घळीमध्ये येतो. याठिकाणी आपल्याला एक कातळटप्पा लागतो. येथील पायऱ्या या सुरुंग लावून इंग्रजांनी फोडल्यामुळे थोड्याश्या अवघड झालेल्या आहेत. परंतु हा कातळटप्पा अत्यंत अवघड देखील नाही. आता येथे बोल्ट बसवलेला असून छोटा रोप देखील लावलेला आहे. त्यामुळे तो कातळटप्पा चढून जायला सोपे पडते. हा कातळटप्पा पार केल्यावर आपण डावीकडे वळून ३ ते ४ पायऱ्या चढून गेल्यावर आपण थेट समोर उभे राहतो ते 'जीवधन किल्ल्याच्या' 'कल्याण  दरवाजासमोर'. गोमुखी रचना असलेले कातळ प्रवेशद्वार अत्यंत सुंदर दगडात कोरून काढलेले आहे. पूर्वी हा दरवाजा अर्धा गाडला गेला होता परंतु आता वनखात्याने आता त्याचे संवर्धन करून संपूर्ण दरवाजा मोकळा केलेला पाहायला मिळतो आणि आपल्याला संपूर्ण दरवाजाचे दर्शन होते. या कल्याण दरवाजाच्या भव्य प्रवेशद्वारावर आपल्याला चंद्र आणि सूर्य कोरलेले पाहायला मिळतात. यावरून हा दरवाजा हा निजामशाहीच्या कालखंडात बांधला असावा त्या दरवाजाच्या रचनेवरून समजते. त्यासाठी त्या दरवाज्याच्या 'कि-स्टोन' च्या 'आर्च' ची रचना नक्कीच समजून घेणे गरजेचे ठरते. 

या सुंदर दरवाजातून आत आल्यावर आपल्याला उजव्या बाजूस एक देवडी पाहायला मिळते जिची अवस्था आज वाईट आहे. येथून वर चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या वरच्या बाजूस येतो येथून जीवधनच्या जुन्नर दरवाजाचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते तसेच दोन बुरुजांच्या मध्ये असलेला दरवाजा आणि त्याची गोमुखी बांधणीची रचना नक्कीच समजून घेता येते. दरवाजाच्या येथून डावीकडे वर आपण  पठारावर येतो आणि मग आपली गडप्रदक्षिणा चालू होते. येथेच आपल्याला उजव्या बाजूस काही घरांची जोती पहायला मिळतात. तसेच येथून समोरच्या बाजूस खाली नाणेघाटाच्या नानाच्या अंगठ्याचे अप्रतिम दृश्य देखील बघायला मिळते. येथून पुढे डाव्या बाजूला चालत गेले असता काही ठिकाणी तुटक तटबंदी देखील पाहायला मिळते. येथून पुढे चालत गेले असता आपण सरळ कड्याच्या शेवटी येतो आणि तिथून आपल्याला 'वानरलिंगी सूळक्याचे' सुंदर दर्शन घडते. इथेच डावीकडे एवढ्यात संवर्धन करताना सापडलेली एक वाड्याची वास्तू देखील पाहायला मिळते.

जीवधन येथील या कातळात खोदलेल्या पायऱ्या यांची रचना. 

येथूनच डावीकडे वर चढत जावे तेथून आपण गडमाथ्यावर अगदी १० मिनिटात जाऊन पोहोचतो. येथून उजवीकडे पाहिले असता आपल्याला 'दुर्ग आणि ढाकोबा' यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते तसेच त्या भागातून जाणाऱ्या दुर्गम घाटवाटा यांचा देखील नजारा पहायला मिळतो. येथून डावीकडे वळाले असता थोडे पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक भग्न मंदिर पाहायला मिळते त्याच्या बांधणीवरून ते पेशवे काळात बांधले असावे असे वाटते. तेथे आपल्याला एक समाधी व 'शिवलिंग' आणि 'नंदी' पाहायला मिळतो येथून पुढे आपण चालट गेले असता आपल्याला आपल्याला एक  मोठे वाड्याचे जोते पाहायला मिळते त्यामध्ये सध्या गडदेवता 'जीवाबाई' हिची मूर्ती ठेवलेली पाहायल मिळते. पूर्वी हि मूर्ती धान्यकोठीच्या जवळ होती आता संवर्धन करताना हि मूर्ती हलवून गडाच्या माथ्यावर असलेल्या वाड्याच्या जोत्यामध्ये ठेवलेली आहे.

या गडदेवता 'जीवाबाईचे' दर्शन घेऊन आपण सरळ बालेकिल्ल्यावरून डाव्याबाजूस उतरलेल्या छोट्या डोंगरधारेवरून उतरावे येथून डाव्या बाजूला आपल्याला पाच पाण्याची टाकी पाहायला मिळतात. तसेच परत येथून उजवीकडे वळून आपण थेट जातो ते 'जीवधन किल्ल्याच्या' धान्यकोठीजवळ. हि धान्यकोठी अर्धी कड्यामध्ये असलेली आपल्याला बघावयास मिळते. अर्धी खोदीव असलेली आणि दर्शनी बांधीव असलेली हि धान्यकोठी खरोखरच अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. ह्या धान्यकोठीच्या दारातून आत गेले असता आपल्याला 'चंद्र आणि सूर्य' तसेच 'गजलक्ष्मी' हि शिल्पे पाहायला मिळतात. येथून आत गेल्यावर आपल्याला ह्या कोठीमध्ये तीन खोल्या खोदलेल्या दिसतात तसेच या खोल्यांच्या बाहेर व्यवस्थित ओसरी देखील बघायला मिळते.

  या पायऱ्या सुरुंग लावून इंग्रजांनी फोडल्यामुळे थोड्याश्या अवघड झालेल्या आहेत.

या कोठीमध्ये संपूर्ण अंधार असल्यामुळे 'टॉर्च' ठेवणे फार गरजेचे आहे.या कोठीमध्ये तीन कमानींंनी युक्त असा दरवाजा आपल्याला पहावयास मिळतो. दरवाज्याच्या वरच्या बाजूस एक पुष्पआकृती देखील बघावयास मिळते. तसेच या कोठीमध्ये आपल्याला सूर्यप्रकाश यावा म्हणून गवाक्ष देखील खोदलेले पाहायला मिळतात. ट्रेकर्स साठी राहायला असलेली गडावरील हि एकमेव वास्तू आहे. हि सुंदर कोठी पाहून आपण कोठीच्या उजवीकडे जावे येथून पुढे काही आपल्याला वाड्यांची जोती पहायला मिळतात तसेच जीवधन किल्ल्याचे खणखणीत बुरुज आणि तटबंदी आपल्याला आजही व्यवस्थित असलेली आपल्याला बघावयास मिळते.

हि तटबंदी आणि धान्य कोठीच्या डाव्या बाजूचे अवशेष बघून आपण परत धान्यकोठीजवळ यावे आणि तेथून डावीकडे जुन्नर दरवाजा बघावयास निघावे.  या धान्यकोठीच्या डावीकडे नुकतेच वनखात्याने 'शौचालये' बांधलेली आहेत. येथूनच पुढे गेले कि आपल्याला पाण्याचा टाक्यांचा समूह पाहायला मिळतो आणि तेथेच परत एक आपल्याला मोठ्या वाड्याचे जोते देखील बघावयास मिळते. तेथून पुढे जाऊन आपल्याला दगडात खोदलेल्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्या उतरून खाली गेले असता आपण पोहोचतो ते सरळ 'जुन्नर दरवाज्यापाशी' सध्या गडाचा दरवाजा अस्तित्वात नाही परंतु दगडात खोदलेल्या दरवाज्याच्या खुणा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तसेच येथे काही 'पोस्ट होल्स' देखील पाहायला मिळतात याच दरवाज्याच्या उजवीकडे आपल्याला खांबटाके देखील पाहायला मिळते. सध्या जुन्नर दरवाज्याच्या काही कातळातील पायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. पूर्वी 'घाटघर' बाजूने किल्ला चढताना ३ अवघड 'रॉक पॅॅच' होते आता त्याठिकाणी वनखात्याने शिड्या बसवल्या आहेत त्यामुळे घाटघर बाजूने येणारी 'जीवधन किल्ल्यावरील' वाट हि देखील अगदी सोपी झालेली आहे.

कल्याण दरवाज्याची अवस्था व त्यावरील चंद्र आणि सूर्य. 

जुन्नर दरवाजा पाहून आपण आल्या मार्गाने वर यावे आणि उरलेली गडफेरी पूर्ण करत राहिलेले अवशेष पाहून 'कल्याण दरवाज्याने' उतरण्यास सुरुवात करावी किंवा ज्यांना 'जुन्नर दरवाज्याने' घाटघर येथे उतरायचे असेल ते तिकडून देखील उतरू शकतात. जुन्नर दरवाज्याने घाटघर मध्ये उतरून परत पायी चालत नाणेघाटाजवळ यावे लागेल ती मात्र भटक्यांनी तयारी मात्र ठेवावी. गड उतरत असताना आपल्याला दुर्ग, ढाकोबा, हि शिखरे तसेच निमगिरी, हडसर, चावंड यांचे सुरेख दर्शन होते. जीवधन किल्ला पूर्ण बघून परत येताना जेव्हा आपल्याला दरवाज्याजवळील बिकट वाटा येतात तेव्हा त्या उतरून किल्ला पाहून पूर्ण होणे यात एक वेगळी मजा 'जीवधन किल्ला' बघताना अनुभवायला मिळते. इतिहास आणि साहस अनुभवायचे असेल तर जीवधन किल्ला नक्की पहावा आपल्याला किल्ला पाहताना एक वेगळाच अनुभव आपल्या गाठीशी बांधला जातो.

जीवधन किल्ल्याचा इतिहास:-

'जीवधन किल्ला' हा जरी सातवाहन काळातील नाणेघाटाजवळ असला तरी त्याच्या अगदी जवळ असलेला 'जीवधन किल्ला' हा सातवाहन काळात बांधला गेला याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. जीवधन किल्ल्याबाबत सगळ्यात पहिले उल्लेख सापडतात ते 'सय्यद अली तबातबा' लिखित 'बुऱहाने मासीर म्हणजेच 'अहमदनगरची निजामशाही' या ग्रंथामध्ये. इ.स. १५ व्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्याच्या इतिहासात जीवधन किल्ल्याचा उल्लेख हा 'जुधान' असा येतो. इ.स. १४८२-१४८३ मध्ये 'मलिक नायब' याचा मुलगा 'मलिक अहमद' याने जेव्हा कोकणावर आणि दक्षिणेतील डोंगराळ मुलुखात स्वारी केली तेव्हा त्या मोहिमेचा वृत्तांत हा 'सय्यद अली तबातबा' याने लिहिलेल्या फारसी ग्रंथात आपल्याला मिळतात. यामध्ये या किल्ल्यांवरच्या मोहिमेची पार्श्वभूमी बघणे नक्कीच महत्वाचे आहे.

गोमुखी रचना असलेले कातळ प्रवेशद्वार अत्यंत सुंदर दगडात कोरून काढलेले आहे.

इ.स. १४८२-१४८३ मध्ये मलिक नायबचा मुलगा अहमद याने कोकण आणि दक्षिणेतील डोंगराळ मुलुखात स्वारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या मुख्य पार्श्वभूमीवर मलिक अहमदने या प्रदेशातील मोहीम  हाती घेतली त्याबाबत 'सय्यद अली तबतबा' लिहितो "अह्मदची इच्छा इस्लाम धर्माला उच्च पातळीवर नेण्याची, जिहाद पुकारून 'मुहम्मद पैगंबरांनी' पुरस्कारलेल्या श्रद्धेचा आणि पवित्र तत्वांचा प्रसार करण्याची श्रद्धा आणि आणि नेकी यांचा अभाव असलेल्या काफरांची बंडे आणि दुष्टपणा यांचे समुळ निर्दालन करण्याची होती. कोकण आणि दक्षिणेच्या डोंगराळ मुलुखातील बहुतेक किल्ले हे काफर आणि मुर्तीपुजकांच्या ताब्यात होते म्हणजेच हिंदूंच्या ताब्यात होते. हिंदूंकडून व्यापारी आणि प्रजाजन यांना उपद्रव पोहोचत असे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ते सर्व किल्ले शत्रूच्या ताब्यातून सोडवणे आवश्यक होते. अहमदने हा विचार पार पडण्याच्या हेतूने लष्कराला खूप बक्षिसे दिली आणि थोड्याच कालावधीमध्ये 'घोडदळ आणि पायदळ' यांनी युक्त अशी फौज जमा केली.

यामध्ये जर नीट 'बुरहाने मासीर' हा 'सय्यद अली तबातबा' लिखित ग्रंथ व्यवस्थित पाहिला तर 'सय्यद अली तबातबा' याने 'मलिक अहमद' याच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीचा विपर्यास केलेला आपल्याला दिसून येतो. या मोहिमेच्या मागे जरी धार्मिक कारण दाखवले असले तरी सुद्धा 'बहमनी राज्यातली राजकीय परिस्थिती देखील लक्षात घेण्यासारखी आहे. यामुळे हि पार्श्वभूमी फारशी विश्वसनीय वाटत नाही. 'मलिक अहमद' याने शिवनेरी येथे स्वारी केली. इस्लामच्या सैन्याने शिवनेरी किल्ल्यावर खूप शौर्य दाखवले. त्याचबरोबर काफरांच्या सैन्याने देखील कडवा प्रतिकार केला आणि शिवनेरीला थोडा काळ वेढा पडल्यावर काफरांना शरणागती घेणे भाग पडले.शिवनेरीचा किल्लेदार आणि सैन्याने 'मलिक अहमद' याला शरण जाण्याची तयारी दर्शवली आणि शिवनेरी किल्ल्याचे दरवाजे उघडले.

'जीवधन' किल्ल्यावरून  'वानरलिंगी सूळक्याचे' सुंदर दर्शन घडते.

'मलिक अहमद' याने 'शिवनेरी किल्ल्यामध्ये' प्रवेश करत तकबीर आणि कलमा यांचा घोष केला आणि 'शिवनेरी' किल्ल्यामधील काफिरांची (हिंदूंची) मंदिरे आणि घरेदारे पाडली आणि त्याठिकाणी मशिदी उभ्या केल्या. येथे 'मलिक अहमद' याला खूप लुट मिळाली त्यामध्ये अहमदच्या सैन्याला रत्ने, जडजवाहीर, कपडालत्ता, गुलाम अशी खूप लुट मिळाली. या लुटीपैकी सरकारी खजिन्यात दाखल करण्यायोग्य वस्तू काढून खजिन्यात भरण्यात आल्या आणि बाकीचा माल सैनिकात वाटला अश्या तऱ्हेने  शिवनेरीचा बळकट किल्ला जिंकून त्याने आपला मोर्चा 'जोंड' म्हणजेच 'चावंड' किल्ल्याकडे वळवला

Share the post

निजामशाहीच्या अस्ताचा साक्षीदार असलेला 'जीवधन किल्ला'

×

Subscribe to महाराष्ट्राची शोधयात्रा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×